नंदुरबार । सध्या राज्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. रविवारी राज्यातील अनेक भागात ढगांचा गडगडाट, वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे शेती पिकांचे प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा हतबल झाला आहे. मात्र यादरम्यान हिंगाेली आणि नंदुरबार जिल्ह्यात वीज काेसळल्याने दाेघांचा मृत्यू झाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील जावदा तर्फे बोरद येथील सपना राजू ठाकरे (वय 14) ही शेतात कामावर असताना तिच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेच तिचा जागीच मृत्यू झाला.
सपना सकाळच्या सुमारास शेतात कापूस वेचणीसाठी गेलेली होती. अवकाळी पावसाचे सावट यार झालेले असताना ढगांचा गडगडाट सुरू झाला. कपाशीच्या झाडाजवळ बसलेल्या सपना हिच्या अंगावर अचानक वीज कोसळली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेच दोन महिला देखील जखमी झाल्या. सपना हिचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शहादा येथे आणण्यात आला.
हिंगोली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. मध्यरात्रीपासून कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील तूर, कापूस या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. औंढा तालुक्यातील चीमेगाव शिवारात शेतात थांबलेल्या तरुणावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. राजेश शंकरराव जायभाये असे मृत तरुणाचे नाव आहे. तो हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील गोजेगाव मधील रहिवासी हाेत. घरातील कर्ता तरूण गेल्याने कुटुंबासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली.















Discussion about this post