जळगाव । चेन्नई येथील समुद्रात महाराष्ट्रातील तीन मुलं वाहून गेली आहेत. यात भंडाराच्या मयुरी उर्फ माही हरिश्चंद्र चौधरी हिचा मृत्यू झाला आहे. तर एका तरुणाला वाचवण्यात यश आलं आहे. मात्र अद्याप एक तरुण बेपत्ता आहे. जय पाटील असं बेपत्ता तरुणाचं नाव असून तो जळगावच्या जामनेर तालुक्यातील पाळधी येथील रहिवाशी आहे. या घटनेने खळबळ उडाली.
महाराष्ट्रातील हे तिन्ही मुलं चेन्नई येथील एका बड्या आयटी कंपनीत इंटर्नशिप करत होते. शनिवारी सुट्टीच्या दिवशी जवळपास २६ जणांचा ग्रुप चेन्नई येथील बीचवर फिरायला गेला होता. याच वेळी समुद्र खवळला आणि महाराष्ट्रातील तीन मुलं वाहून गेल्याचं समजत आहे.
मयुरी चौधरी असं मृत पावलेल्या तरुणीचं नाव आहे. ती मूळची भंडारा येथील रहिवासी आहे. तर पाळधी (ता. जामनेर) येथील रहिवासी असलेल्या जय पाटील नावाचा युवक अद्याप बेपत्ता आहे. एकाला वाचवण्यात बचाव दलाला यश आलं आहे. परराज्यात महाराष्ट्रातील मुलांसोबत असं अनर्थ घडल्याने मूळ गावी हळहळ व्यक्त होत















Discussion about this post