शेतकऱ्यांना शेतीच्या खतांचा दरवाढीचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून सतावत आहे. यातच आता नवीन वर्षात हे दर अजूनच वाढणार असल्याचे समोर आले आहे. नवीन वर्षात १ जानेवारीपासून रासायनिक खतांचे दर वाढणार असून, यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
रासायनिक खतांच्या किमती आधीच जास्त असताना खत उत्पादक कंपन्यांनी १ जानेवारी २०२५ पासून दरवाढ जाहीर केली आहे. त्यानुसार रासायनीक खतांच्या किमतीमध्ये २०० ते ३०० रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.
शेतकऱ्यांना आधीच त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोयाबीनचे दर वाढतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी विक्री थांबवली होती; मात्र उलट दर कमी झाले. खत उत्पादक कंपन्यांनी १ जानेवारी २०२५ पासून रासायनिक खतांच्या किमती वाढवल्या आहेत.
वाढीव दरानुसार डीएपी (डाय अमोनियम फॉस्फेट) खताची किंमत प्रतिपिशवी १ हजार ३५० रुपयांवरून १ हजार ५९० रुपयांवर गेली आहे. टीएसपी ४६ टक्के (ट्रिपल सुपर फॉस्फेट) खताची किंमत १३०० ऐवजी १३५०, तर १०:२६:२६ आणि १२:३२:१६ या खतांच्या किमती १४७० रुपयांवरून १७२५ रुपये होणार आहे.















Discussion about this post