नवी दिल्ली । मंगळवारी लोकसभा २०२४ च्या निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये NDA अन् INDIA आघाडीच्या बैठका होणार आहे.
भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्यांना खास मित्रांची गरज आहे. त्यामुळेच आज दिल्लीमध्ये एनडीएकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तर इंडिया आघाडीनेही महत्वाची बैठक बोलावली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत NDA सध्या 294 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडी 231 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू हे किंगमेकरच्या भूमिकेत असतील.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत एनडीएच्या बैठकीच आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला सर्व मित्रपक्षांना बोलावण्यात आले असून महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीसाठी जाणार आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, इंडिया आघाडीचीही आज महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे, संजय राऊत, शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीतील देशभरातील नेते उपस्थित राहणार आहेत. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू इंडिया आघाडीच्याही संपर्कात असल्याचे सांगण्यात येत असून त्यांची साथ कोणाला मिळणार? यावर सत्तेच्या सारीपाटाचा खेळ रंगणार आहे.















Discussion about this post