मुंबई । मंत्रालयातील लाच प्रकरणानंतर मंत्री नरहरी झिरवाळ अडचणीत सापडले आहे. आज ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपली बाजू मांडणार असल्याचे समजतेय. धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्यानंतर आता झिरवाळ राजीनामा देणार का? याची चर्चा सुरू झालेली आहे.
मंत्रालयातील लाच प्रकरण समोर आल्यानंतर दोषी आढळलो तर राजीनामा देईल, असं झिरवाळ स्पष्ट म्हणाले होते. आता या प्रकरणात दररोज नवनवे पुरावे समोर येत आहेत. झिरवाळ यांचा थेट याच्याशी संबंध अद्याप समोर आलेला नाही. पण विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे आता सुनेत्रा पवार काय निर्णय घेणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ असलेले झिरवळ आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. लाच प्रकरणाचे पडसाद उमटल्यानंतर नरहरी झिरवळ कोणाच्याही संपर्कात नव्हते. त्यांच्या या ‘नॉट रिचेबल’ असण्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात होते. दरम्यान, विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत झिरवळ यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. मंत्रालयातील या लाच प्रकरणामुळे झिरवळ पूर्णपणे कोंडीत सापडले असून, सुनेत्रा पवार यांच्यासोबत होणाऱ्या भेटीत काय चर्चा होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.















Discussion about this post