विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करायचे की पाडायचे याबाबत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी आज महत्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीपूर्वी त्यांनी विद्यामान सरकार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ले केले
आमचा आनंद हिरावून घेणाऱ्यांना सुट्टी नाही. आमच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. पण आम्ही आमच्या लक्षाचा वेध घेणार आहोत. आम्हाला संपवणाऱ्यांना संपवणार म्हणजे संपवणारच. मग त्यासाठी कोणतीही प्रक्रिया असो. आमची सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील संधी हिरावून घेतली. आता हिशेबच होणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी केला.
आता त्यांची वाट लावणार…
सरकार अन् देवेंद्र फडणवीस यांना काहीच अधिकार नसताना त्यांनी आमचे बळी घेतले. शेवटी जातात जातात आमच्या नाकावर टिच्चून ओबीसींच्या काही जाती आरक्षणात घातल्या. परंतु मराठ्यांना काही दिले नाही. मराठ्यांचे मुले मोठे होऊ नये, या भूमिकेतून ते उतरले. आता त्यांची वाट लावल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. त्यासाठी जी प्रक्रिया करावी लागेल ती करु.
मराठा पडाव करणारच…
आमचा समाजाला इतके टार्गेट करण्याची गरज नव्हती. सरकारने आमच्या समाजाची मने दुखवली आहे. सरकारने सूडबुद्धीने वार करत आरक्षण हिरावून घेतले आहे. त्यांनी जाती जातीत खून्नस लावून दिली. ते अत्यंत क्रूर आहेत. जातीत जातीत त्यांनी विष पेरले आहे. आता त्यांचा पडाव मराठा लोकच करणार आहे.















Discussion about this post