मणिपूर पुन्हा एकदा हिंसाचाराच्या विळख्यात सापडले असून जिरीबाम येथे तीन मुलांची आई असलेल्या ३१ वर्षीय महिलेला जिवंत जाळण्यात आल्याची घटना समोर आलीय. महिलेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जे समोर आले आहे ते धक्कादायक आहे. तिला ठार मारण्यापूर्वी तिच्या क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या होत्या.
पीडित महिलेला जिवंत असताना तिच्या शरीरावर नखांनी भोसकले होते. थर्ड डिग्री टॉर्चर देण्यात आले. तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर महिलेला जिवंत जाळण्यात आले.शेजारच्या आसाममधील सिलचर मेडिकल कॉलेजमध्ये महिलेचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. मात्र, तिचा मृतदेह इतका जळाला होता की, तिच्यावर बलात्कार झाला की नाही हे समजू शकले नाही. अस्थीचे पोस्टमॉर्टम केल्यासारखे वाटत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, तिच्यावर अतिरेक्यांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप स्थानिक लोक आणि तिचे कुटुंबीय करतात.
ही महिला जयरावण गावातील रहिवासी होती. ती आदिवासी समाजातील होती. मणिपूर महिलेचे शरीर 99 टक्के जळाले होते. हाडेही जळून राख झाली. शवविच्छेदन अहवालात उजव्या मांडीच्या मागच्या भागात जखम तर डाव्या मांडीच्या मध्यभागी लोखंडी खिळा अडकल्याचे आढळून आले. डॉक्टरांनी सांगितले की, मृतदेह 99 टक्के जळाला आहे, हाडेही जळाली आहेत. सुरक्षा यंत्रणांनी मारेकऱ्यांची ओळख पटवण्यास असमर्थता दर्शवल्याने संतापाची लाट उसळली आहे. फेरझावल आणि जिरीबामच्या आदिवासी जमाती वकिल समितीने दोन आदिवासी बहुल जिल्ह्यांतील कुकी-झोमी-हमार लोकांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय हस्तक्षेपाची विनंती केली आहे. हल्लेखोरांना अटक न झाल्यास चुरचंदपूर येथील आदिवासी समुदायाच्या फोरम ऑफ इंडिजिनस ट्रायबल लीडर्सने आंदोलनाचा इशारा दिला आहे.















Discussion about this post