राज्यातील महिलांसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे तब्बल ६८ लाख लाभार्थ्यांचे बँक व्यवहार तात्पुरते थांबवण्यात आले आहेत. मात्र शासनाने पडताळणीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिल्याने लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या महत्त्वाकांक्षी योजनेत सुरुवातीला सुमारे २४.३ दशलक्ष (२ कोटी ४३ लाख) खाती नोंदवली गेली होती. मात्र पडताळणी मोहिमेदरम्यान अपात्र लाभार्थी आणि गैरप्रकार आढळल्याने ६.८ दशलक्ष (६८ लाख) खात्यांचे व्यवहार रोखण्यात आले आहेत. सध्या सुमारे १७.५ दशलक्ष (१ कोटी ७५ लाख) महिलांची खाती सक्रिय असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला दरमहा १,५०० रुपये दिले जातात, ज्यासाठी शासनाकडून दरमहा सुमारे ३,७०० कोटी रुपये खर्च केले जातात. नव्या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवरील आर्थिक ताण कमी होण्यास मदत होणार असून अपात्र लाभार्थ्यांना दिलेले पैसे परत वसूल केले जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच, योजना कोणत्याही परिस्थितीत बंद केली जाणार नसून पात्र महिलांना लाभ मिळत राहील, असा विश्वास राज्य सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे. ज्या महिलांचे व्यवहार थांबवण्यात आले आहेत, त्यांनी ३० एप्रिलपूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करून आधार कार्ड बँक खात्याशी जोडणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.















Discussion about this post