जामनेर,(प्रतिनिधी)- जामनेर पोलीस स्टेशनवर करण्यात आलेल्या दगडफेकी प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात एकूण ३०० ते ४०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात १४ जणांना अटक केल्याची माहिती मिळाली आहे.
गुरुवारी रात्री बालिकेवर आत्याचार करुन हत्या करणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला जमावाने आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली होती. मात्र यांनंतर जमावाच्या पोलीस ठाण्यावर तुफान दगफ फेक केली. या हल्ल्यात एकूण १५ पोलीस जखमी झाले आहेत. सदर घटनेचा तपास हा एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे देण्यात आला आहे.
संशयित आरोपी म्हणून शालूसिंग शेवाळे (रा. गिरजा कॉलनी, जामनेर), अशोक बंडू भिल (रा. खडकी ता. जामनेर), श्रीराम भिल, पंकज देविदास ठाकरे (दोन्ही रा. गोविंद महाराज झोपडपट्टी, जामनेर), प्रमोद विश्वनाथ सुरवाडे, युवराज सुकराम पवार, आकाश युवराज पवार (तिन्ही रा. जामनेरपुरा), प्रदीप रवींद्र कोळी, रितेश जितू मोरे, अमोल हरदास सोनवणे (सर्व रा. सामरोद ता. जामनेर), मंगल ज्ञानेश्वर ठाकरे (रा. हिवरखेडा ता. जामनेर), दीपक अशोक पवार (रा. चिंचोली ता. जळगाव), आकाश सुनील पवार (रा. ओझर ता. जामनेर) या १३ संशयीतांसह ३०० ते ४०० महिला व परुषांवर गन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस विभागाकडे हल्ल्याच्या घटनेचे सिसिटीव्ही फुटेज, व्हिडीओ उपलब्ध असून त्यातून तपासून आरोपी निष्पन्न करण्यात येणारं आहेत.
सदर घटनेमध्ये आरसीपी पथकातील सरकारी वाहन (एम एच १९ एम ९२३६) देखील क्षतिग्रस्त झाले आहे. तसेच जामनेर पोलीस स्टेशनच्या सर्व खिडकी, दरवाजे, टेबलांचे काचा फुटून नुकसान झाले आहे. घटनेचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे देण्यात आला आहे. (केसीएन) बालिकेवर अत्याचार करून खून करणारा संशयित आरोपी सुभाष उमाजी भिल (वय ३५, रा. भिलखेडा ता. जळगाव) ला शुक्रवारी दि. २१ जून रोजी दुपारी ३ वाजता जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती शरद पवार यांनी पाच दिवसांची म्हणजेच २५ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.















Discussion about this post