जामनेर | तालुक्यातील चिंचखेडा येथील सहावर्षीय बालिकेचा अत्याचार करून हत्या केल्याची घटना ११ जूनला समोर आली होती. या प्रकरणातील फरार संशयित सुभाष भिल यास भुसावळ पोलिसांनी अटक केली. या अटकेची माहिती मिळताच जमावांनी आरोपीला आमच्या ताब्यात देण्याची मागणी करत जामनेर पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. दरम्यान, या घटनेवर गिरीश महाजन यांनी ट्विट केलं आहे.
काय म्हटलं आहे ट्विटमध्ये
““काल रात्री जामनेरात दिसून आलेला जनतेचा आक्रोश आणि संताप रास्त आहे. कोणत्याही संवेदनशील नागरिकाचा संताप अनावर व्हावा असेच कुकृत्य संबंधित नराधमाने केले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मी देखील आपल्या इतकाच संतप्त आणि व्यथित आहे. पण माझी सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया भावनांना आवर घालावा. कोणीही कायदा हातात घेऊ नये. तपास यंत्रणेला त्यांचे काम करू द्यावे. दोषी व्यक्तीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, या दृष्टीने काटेकोर तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिस्थितीवर मी लक्ष ठेवून आहे. संकटग्रस्त परिवाराला आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्याचीही सूचना मी प्रशासनाला केली आहे”, असं गिरीश महाजन म्हणाले.















Discussion about this post