जळगाव | ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे हाताशी आलेली पिके वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान हवामान खात्यान आज देखील जळगावसह राज्यातील १५ जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे.
या जिल्ह्यांना इशारा
हवामान खात्याच्या अंदाजनुसार मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याचा अंदाज आहे. अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, जालना, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर या भागात आज अवकाळी पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. यादरम्यान विजांचा मोठा कडकडाट देखील बघायला मिळाले.
सतत अवकाळी पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पिक गेले. या पावसाचा फटका सर्वांनाच बसत आहे. नांदेड जिल्ह्यात चौथ्या दिवशीही अवकाळणी पाऊस झाला. नांदेड शहरसह अर्धापूर, मुदखेड तालुक्यात पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने येलो अलर्ट नांदेड जिल्ह्याकरिता जारी केला होता. पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे.















Discussion about this post