सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. विधि व न्याय विभागात गट क मध्ये भरती सुरु आहे. या विभागात विविध पदांसाठी भरती सुरु आहे. या भरतीची जाहिरात विधि व न्याय विभाग, मंत्रालयाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये भरतीची सर्व माहिती देण्यात आली आहे.
विधी व न्याय विभागात वाहन चालक या पदासाठी भरती सुरु आहे. १०वी पास उमेदवारदेखील या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. फक्त उमेदवाराला वाहन चालवण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ही ६८ वर्ष असावी. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा. या नोकरीसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना १९,९०० ते ६३,२०० रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त शाळेतून माध्यमिक शिक्षण म्हणजे १० वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत उमेदवाराकडे वाहन चालवण्याचे लायसन्स असायला हवे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला तीन वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभव असायला हवा. २ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.
नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा वाचता येणे आवश्यक आहे. विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नोकरी करावी लागणार आहे.२० सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उप सचिव (प्रशासन), ३ रा मजला, विस्तार इमारत, विधीव न्याय विभाग, मंत्रालय ४०० ०३२ येथे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.















Discussion about this post