नवी दिल्ली । २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला अजून काही महिने बाकी आहेत. मात्र, याआधीही मोदी सरकारने मोठा मास्टरस्ट्रोक खेळला आहे. एक मोठा निर्णय घेत केंद्र सरकारने PMGKAY योजनेअंतर्गत मोफत रेशन योजनेला पुन्हा मुदतवाढ दिली आहे. आता लोकांना येत्या ५ वर्षांसाठी मोफत रेशन योजनेचा लाभ मिळणार आहे.
कोरोनाकाळात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) सुरू करण्यात आली होती. यामध्ये प्रत्येक गरजू व्यक्तींना ५ किलो अनुदानित अन्नधान्याव्यतिरिक्त दर महिन्याला ५ किलो मोफत अन्नधान्य दिले जाते. ही योजना पुढील ५ वर्षांसाठी वाढवल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचा देशभरातील एकूण 81 कोटी लोकांना फायदा होणार आहे.
किती खर्च येईल?
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी PMGKAY योजनेंतर्गत मोफत रेशन देण्याची माहिती शेअर केली आहे. ते म्हणाले की, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुढील 5 वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा फायदा 81 कोटी लोकांना होणार आहे. यामध्ये भारत सरकार 11 लाख 80 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. गेल्या 5 वर्षांत सुमारे 13.50 कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आले आहेत, असेही ते म्हणाले.















Discussion about this post