मुंबई । सातत्याने वादात राहणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केलंय. मात्र यावेळी त्यांच्या विधानावरून थेट महायुतीतच वाद निर्माण झालाय. दुत्वासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या नितेश राणेंनी गणपती मंडळाच्या भेटीदरम्यान आपल्या भाषणात हिंदू सोडून कोणाशीच व्यवहार करु नका, अशी जाहीररित्या शपथ दिली.
एवढंच नव्हे तर मुस्लिमांवर टीका करताना त्यांची जीभ घसरली. हिरव्या सापांना दूध पाजू नका हे आपले कधीच होणार नाहीत असेही तारे त्यांनी तोडले. मात्र त्यांच्या या विधानावरून महायुतीतच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. सत्ताधारी नेत्यांचे कान टोचतांना एखाद्या समाज घटकाविरोधात बोलणं चुकीचं आहे, असं म्हटलंय.
काय म्हणाले नितेश राणे?
नितेश राणे म्हणाले की, ”माझ्या सहकार्यांनी एक शपथ घेतली पाहिजे. मी जो काही व्यवहार करेल, तो फक्त हिंदूंशीच करेल.” ते म्हणाले, यापुढे कुठलाही व्यवहार जो पण कराल तो फक्त हिंदूशीच, ही शपत घेऊनच सर्वांनी येथून निघायचं आहे.”
याच विधानामुळे राज्याच्या वातावरणासोबतच महायुतीतील वातावरणदेखिल तापणार आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी सत्ताधारी नेत्यांचे कान टोचतांना एखाद्या समाज घटकाविरोधात बोलणं चुकीचं आहे, असं म्हटलंय.
याआधी देखील भाजप आमदार नितेश राणेंनी मशिदीत घूसून मारण्याचं वक्तव्य केलं होतं तेव्हा महायुतीतील मुस्लिम नेत्यांनी बघ्याची भूमिका घेतली होती परंतू आता भाजप मधील मुस्लिम नेते आणि भाजपसोबत युतीत असणारे अजित पवारगटाचे हसन मुश्रीफ, बाबा सिद्धीकी आणि शिंदे यांच्यासोबत असलेले अब्दुल सत्तार याविधानावर प्रतिक्रीया देतात की, पुन्हा मूग गिळून गप्प बसतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.















Discussion about this post