जळगाव । ऐन थंडीत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने राज्यांत शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार राज्यात आलेल्या या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पाऊस झाला जळगाव जिल्हयातील देखील काही भागात पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बीच्या व काढणीला आलेला तूर पिकाला फटका बसला आहे.
बुलढाणा जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यांत शुक्रवारी आणि शनिवारी अवकाळी पाऊस पडत आहे. मोताळा तालुक्यांमध्ये पाऊस झाल्यावर आता खामगाव तालुक्यात सुद्धा विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कांदा, तूर, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात सुद्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका बसला होता. आता पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेला घास हिरावला आहे.
जळगाव, नगर जिल्ह्यात पाऊस
अहमदनगरमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण आहे. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी पाऊस सुरू झाला. ऐन थंडीत पाऊस सुरू झाल्यामुळे नागरिकांना स्वेटर सोडून छत्र्या बाहेर काढाव्या लागल्या. या पावसाचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर होणार आहे. नागरिकांच्या आरोग्यसह पावसामुळे हरभरा, ज्वारी आणि गहू पिकांवरही होणार आहे. जळगाव जिल्ह्यात काही भागात झालेल्या अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बीच्या व काढणीला आलेला तूर पिकाला फटका बसला आहे. मुक्ताईनगर बोदवड तालुक्यात अवकाळी पावसामुळे रब्बीतील गहू, हरभरा, मका तसेच शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेली तूर पीक खराब झाले. शेतकरी तिसऱ्यांदा अवकाळी पावसामुळे संकटात सापडला आहे.















Discussion about this post