मुंबई । राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. केवायसीमध्ये चुका झालेल्या महिलांना दुरुस्ती करण्याची अंतिम संधी देण्यात आली असून, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता केवळ पाच दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.
अनेक महिलांनी केवायसी करताना विचारलेल्या प्रश्नांचे अर्थ नीट न समजल्यामुळे चुकीची माहिती भरली होती. परिणामी, अशा लाभार्थ्यांचा हप्ता तात्पुरता थांबवण्यात आला आहे. मात्र, शासनाने त्यांना पुन्हा एकदा संधी देत ३१ मार्च २०२६ पर्यंत केवायसी दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत.
केवायसी करण्यासाठी शेवटचे ५ दिवस उरले आहेत. त्याआधी महिलांना हे काम करायचे आहे. अन्यथा त्यांचा लाभ कायमचा बंद होणार आहे. महिलांना यापुढे योजनेचा हप्ता मिळणार नाही.
केवायसी कशी करावी?
सर्वात आधी तुम्हाला https://ladakibahin.maharashtra.gov.in/ /e या वेबसाइटवर जायचे आहे. यानंतर तुम्हाला समोर ईकेवायसीची संधी त्या लाभार्थ्यांना आहे त्यांनी ईकेवायसी करताना चुकीचे पर्याय निवडले. त्यावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि फोन नंबरची माहिती द्यायची आहे. यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, त्याची योग्य उत्तरे द्या. यावेळी प्रश्न नीट वाचून मग त्याची उत्तरे द्या. जर तुम्ही चुकीची उत्तरे दिली तर तुम्हाला पुन्हा संधी मिळणार नाही. यानंतर तुमचा लाभ कायमचा बंद केला जाईल.















Discussion about this post