जळगाव । जळगाव जिल्ह्यातील काही नगरपालिकांमध्ये महायुतीमध्ये गडबड झाल्याने स्थानिक स्तरावर निर्णय घेऊन भाजप विरुद्ध शिवसेना असाच सामना रंगला असून दोन्ही पक्षातील नेते आमने-सामने आले आहेत. दरम्यान, भडगाव पाचोऱ्यात दोन नंबर धंदे करणारे उमेदवार उभे केल्याच्या आरोपावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना प्रत्युत्तर दिले. दोन नंबर धंदे करणारा आमचा एक जरी उमेदवार उभा असेल तर त्यांनी नाव घेऊन सांगावं, मी समोरच्याला बिनविरोध करेल. खोटं बोलायचं, लोकांची बदनामी करायचं हे काम भाजप करत आहे, अशा शब्दात आमदार पाटील यांनी हल्लाबोल केला.
आमदार किशोर पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यावरुन पटलवार केला. तसेच, भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यावरही बोचरी टीका केली. आमचा एकही नगरसेवक निवडून येणार नाही असे म्हणणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं सारख आहे. भाजपचा एखादा नगरसेवक निवडून आला तर खूप झालं.
माझं भाजपला चॅलेंज आहे, भडगाव, पाचोरा या दोन्ही नगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल. रवींद्र चव्हाण यांनी युती टिकवायची की नाही, हा महाराष्ट्राचा विषय आहे. परंतु, युती टिकवायची नाही हे मी 1 नोव्हेंबरलाच जाहीर केलेलं आहे, असे म्हणत किशोर पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. गद्दारांशी दोस्ती करून पाठीत खंजीर खुपसून घेण्यापेक्षा एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या, असेही त्यांनी म्हटले.
चाळीसगाव नगर परिषदेत शिवसेनेचे शिंदे गटाचे जे उमेदवार उभे आहेत, त्यांना महाविकास आघाडीकडून उभं करण्याचा माझा प्रयत्न होता. मी माझ्या लोकांच्या विरोधात चाळीसगावमध्ये आलो नाही तर महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ इथे आलो आहे, असे म्हणत येथे त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देत भाजपविरुद्ध भूमिका घेतली.















Discussion about this post