नागपूर । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान विदर्भात काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. नागपूरमध्ये तब्बल २२१ पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. या सामूहिक राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून २२१ पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. नगरपंचायत, नगरपालिकेत मनमानी झाल्याचा आरोप करत या सर्वांनी राजीनामे दिले असल्याची माहिती समोर आली आहे. वाडी पालिका क्षेत्रातील काँग्रेस कार्यकारिणी सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. त्यामुळे हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
नगरपालिका अध्यक्ष पदाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील व्यक्तीला देताना विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून पक्षात निष्ठेने काम करणाऱ्यांचा हा अपमान आहे. याच कारणावरून २२१ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला असल्याचे सांगितले. या सर्व पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे प्रदेश अध्यक्षांकडे पाठविण्यात आले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. हे सर्व पदाधिकारी नेमके कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची देखील चर्चा होऊ लागली आहे.















Discussion about this post