जळगाव : राज्यभरात होऊ घातलेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. अनेक नेत्यांनी कुटुंबातील सदस्यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. यामुळे अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचे चित्र पाहायला मिळत आहे.
जळगाव जिल्ह्यातील 18 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये स्थानिक नेत्यांच्या सोयीप्रमाणे युती करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकारण हे स्थानिक आमदार व माजी मंत्र्यांच्या प्रभावक्षेत्राभोवती फिरताना दिसत असून, अनेकांनी आपआपल्या कुटुंबीयांना उमेदवारी दिल्याने घराणेशाहीचा ठळकपणे दिसून येत आहे. याच मुद्द्यावरून रोहिणी खडसे यांनी सत्ताधारी पक्षावर सडकून टीका केली आहे.
जामनेर – सौ. साधना गिरीश महाजन (मंत्र्यांची पत्नी) मुक्ताईनगर – संजना चंद्रकांत पाटील (आमदारांची लेक) चाळीसगांव – सौ.प्रतिभा मंगेश चव्हाण (आमदारांची पत्नी) भुसावल – सौ. रजनी संजय सावकारे (मंत्र्यांची पत्नी) पाचोरा – सौ. सुनीता किशोर अप्पा पाटील (आमदारांची पत्नी) पाचोरा – सौ. सुचिता दिलीप वाघ (भाजप मा.आमदारांच्या पत्नी)
राज्यभरात होणाऱ्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी काल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. अनेकांनी अर्ज भरले तसे आमच्या जळगावमध्येही भरण्यात आले. मात्र आमच्या जिल्ह्यात काय अढळतंय पहा.. सत्ताधाऱ्यांची वृत्ती म्हणजे हम करे तो राजनीती तुम करो तो घराणेशाही असा घणाघात रोहिणी खडसे यांनी सत्ताधारी पक्षांना लगावला आहे.















Discussion about this post