सौदी अरेबियामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातानंतर बसने आणि डिझेल टँकरने पेट घेतला. यामध्ये मक्का येथून मदीना जात असलेल्या ४२ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. ते सर्व हैदराबाद आणि तेलंगणचे रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाच्या मदीनाजवळ झालेल्या या अपघातामध्ये ४२ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. हे सर्वजण भारतातून मक्का येथे उमराह करण्यासाठी गेले होते. उमराह करण्यासाठी निघालेल्या भाविकांना घेऊन ही बस मक्कावरून मदीनाला जात होती. याचवेळी महामार्गावर या बसला डिझेलच्या टँकरने धडक दिली.
टँकरने धडक दिल्यानंतर बसने पेट घेतला. त्यामुळे बसमधील भाविकांना बाहेर पडता आले नाही. या अपघातामध्ये भाविक जिवंत जळाले. या अपघातामध्ये ४२ भारतीयांचा मृत्यू झाला. हे सर्वजण हैदराबादचे होते अशी माहिती समोर आली आहे. बसमधून ४३ जण प्रवास करत होते. याअपघातामध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली.
या अपघातामध्ये फक्त एकच व्यक्ती बचावली. ही व्यक्ती गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतीय वेळेनुसार हा अपघात मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास मुफ्रीहाट परिसरात झाला. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा देखील समावेश आहे. बसमध्ये असणाऱ्या ४३ प्रवाशांमध्ये २० महिला आणि ११ मुलं होती.















Discussion about this post