मुंबई । बिहार विधानसभेत भाजप-जनता दल (संयुक्त) ने ऐतिहासिक विजय मिळवीत महाआघाडीचा धुव्वा उडवला. या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना शरद पवारांनी बिहार निवडणुकीचं विश्लेषण केलं. मात्र, यावेळी बोलताना शरद पवारांनी निवडणूक आयोगाला सूचक इशाराही दिला आहे. बिहारमध्ये निवडणुकीच्या आधी महिलांच्या खात्यात दहा-दहा हजार रुपये देण्यात आले, त्यामुळे निवडणुका पारदर्शक पद्धतीने होतात का? याचा निवडणूक आयोगाने गांभीर्याने विचार करावा, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांनी मीडियाशी बोलताना पैसा वाटप केल्यानंतरही निवडणूक आयोगाने बघ्याची भूमिका घेतली असे म्हटले. “निवडणुकीपूर्वी १० हजार रुपये वाटप करणं हे एक प्रकारचं करप्शन आहे. आणि ते सरकारने केलं आहे. महाराष्ट्रातही तेच झालं होतं. त्याचे परिणाम आम्ही भोगले आहेत. महाराष्ट्रातही निवडणुकीपूर्वी पैशाचं वाटप केलं होतं. याचा आनंद ज्याला लाभ झाला असेल त्याला होणारच” असे शरद पवार म्हणाले.
निवडणुकीत युती करणार का?
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती करणार का याविषयी बोलताना शरद पावर म्हणाले की, “राज्यात पंचातय आणि नगरपरिषदेच्या निवडणुका येतील. पार्टी म्हणून या निवडणुका लढवल्या जातात. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आम्ही निर्णय घेतला की त्या तालुका आणि जिल्ह्यात पक्षाचे सहकारी आहेत त्यांनी निवडणुकीबाबतचा निर्णय घ्यावा.”















Discussion about this post