चाळीसगाव । जळगाव जिल्ह्यात म्हणाला तसा पाऊस पडला नसला तरी मात्र मागच्या काही दिवसात पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे गिरणा धरण ६५% भरले आहे.त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी गिरणा धरणात केवळ २१% पाणीसाठा शिल्लक होता. मात्र, मागच्या काही दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि जळगाव जिल्ह्यातही झालेल्या पावसाने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आतापर्यंतच्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात एकूण ४४% वाढ झाली आहे.
गिरणा पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पुढील आठवड्यात धरणातील पाणीसाठा ८०% पर्यंत पोहोचेल. यामुळे नदीकाठच्या गावांना आणि शेतीत सिंचनासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
Discussion about this post