जळगाव : जळगाव बाजारात सध्या नवीन तूर विक्रीसाठी येत आहे. परंतु, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या तुलनेत तुरीच्या दरात कमालीची घसरण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. क्विंटलमागे एक ते दीड हजारांनी भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. त्यामुळे तूर घरात ठेवायची की विकायची? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
यंदा पावसाच्या लहरी पणाचा फटका सोयाबीन, कपाशीसह सर्वच पिकांना बसला आहे. यात आता काढणीला आलेल्या तुरीला देखील याचा फटका बसला आहे. पावसाच्या उघडीपमुळे पिकांची वाढ खुंटली. त्यातच ऐन बहरात असताना किडींचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन निम्म्याहून खाली आले. तर तूर शेंगा धरण्याच्या स्थितीत असताना रावेर व अन्य भागात गारपिटीचा फटका बसला त्यामुळे तुरीचे नुकसान झाले.
अगोदरच निसर्गाच्या लागरीपणामुळे उत्पादनात घट झाली आहे. यामुळे शेतकरी अगोदरच संकटात सापडला असताना आता तूर काढणी करत विक्रीसाठी नेत आहे. मात्र बाजार समितीत क्विंटलमागे तब्बल एक हजार रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दर घसरल्याने तूर विक्री करायची कि विकायची या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.















Discussion about this post