जळगाव । राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज जळगावात आले आहे. यादरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंवर जोरदार टीका केली. एकनाथ खडसेंनी जमीन घोटाळ्यामध्ये त्यांनी तोंड काळ केले होते. त्यांनी तोंड काळ केले नसते तर त्यांना काळे झेंडे दाखवण्याची वेळ आली नसती, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केली आहे.
एकनाथ खडसे यांना आता नवीन मालक मिळाला आहे, त्या नवीन मालकांनी जसे सांगितले तसे एकनाथ खडसे करतात.अशा काळ्या झेंड्यांना घाबरणारे आम्ही नाही. एकनाथ खडसेंनी तोंड काळे केले नसते तर त्यांना नवीन मालकाकडे जावे लागले नसते. त्यांना आपल्या परिवारात राहता आले असते. आम्ही जनतेची लोक आहोत.
जनतेसाठी काम करत आहोत, जनतेला फायदा देण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. आणि जळगावची जनता आमच्या सोबत आहे, असा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला.
Discussion about this post