जळगाव । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता काही तासच शिल्लक असताना जळगावमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख व माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. दरम्यान, भंगाळे हे शिवसेना (एकनाथ शिंदे) गटात प्रवेश करणार असल्याचं समजत असून यामुळे ऐन निवडणूक तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
विष्णू भंगाळे यांच्यासोबत युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्याकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने शहरात महायुतीला मोठी ताकद मिळणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी विष्णू भंगाळे शहरातून उबाठा गटाचे उमेदवार राहू शकतात, अशी शक्यता देखील वर्तविण्यात येत होती. मात्र उबाठातर्फे जयश्री महाजन यांना तिकिट मिळाले. मध्यंतरीच्या काळात ते उबाठा गटाला जय महाराष्ट्र करतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र आता विधानसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या काही तासांवर येवून ठेपले असतांना त्यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करत आहेत.
Discussion about this post