विधानसभा निवडणुकीत लढायचं कि पडायचं याबाबत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आजच्या बैठकीत आपला निर्णय जाहीर केला. उपस्थित कार्यकर्त्यांसोबत बोलताना जरांगेंनी मराठ्यांना महत्वाचा आदेश देत निवडणुकीत उतरवण्याचा प्लॅन सांगितला. मला माझ्या समजासाठी आंदोलन करायचे आहे. मविआ आणि महायुती आरक्षण देतो म्हणत नाहीत. महायुती,मविआने अजून यादी जाहीर केली नाही. पण जर आपलं ठरले तर दोघांचा कार्यक्रम करायचा, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
विधानसभा निवडणुकांची उभे करायचे की पडायचे? असा सवाल यावेळी मनोज जरांगे यांनी उपस्थित मराठ्यांना विचारला. यावेळी सर्वांनी एकच लढण्याचा निर्धार केला. माजी निवडणुकीकडे जायची इच्छा नाही, पण मी समाजाच्या पुढे नाही. समाजाचे जे म्हणणं ते माझं आहे, असे म्हणत जरांगे यांनीही खो दिला. आपण राजकारणात जाऊ नये, अशी माझं म्हणणं आहे. पण तुम्ही सर्वांनी पाडायचे की उभे राहायचे ठरवा. माझी इच्छा राजकारणात जायची इच्छा नाही.
जर उभा करायचं ठरलं तर माझे प्रश्न आहे. उभा करायच्या नादात माझ्या समाजाचा प्रश्न मागे राहील. राजकारण झाले तर माझा समाज पुन्हा एकत्र राहील का? महावि आणि महायुतीवाले सगळे सख्खे मावस आहेत. आपण उभे राहिले की भाजप वाले खुश होतील. आणि उभे नाही केले तर माहाविकास आघाडी वाले खुश होतील, असे जरांगे म्हणाले. आपल्या हाताने आपण संपू नये म्हणून वेगळा मार्ग काढला पाहिजे. आपण गाफील राहिलो तर अवघड आहे, असेही जरांगे म्हणाले.
प्रत्येक मतदारसंघात १ लाख मतदान आहे. कुणाला लीड तुटते. आपण कुठं निवडून येऊ शकतो. दलीत मुस्लिम एकत्र आहे ते पाहुयात. मी समीकरण जुळवत आहे. तुम्ही फॉर्म भरून घ्या. फॉर्म मागे घ्यायच्या रोजी आपण सांगू. Sc st च्या जागी उमेदवार देऊ नये. तिथं आपल्या विचारांच्या माणसाला मते देऊ. जिथं उभे करणार नाही पण जो आपल्याला जो ५०० बाँडवर लिहून देईल, त्याला मतदान देऊ, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.















Discussion about this post