मुंबई । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच आता इनकमिंग आऊटगोईंगला सुरुवात झाली आहे. मात्र यातच अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे
अजित पवार गटाचे दोन आमदार सध्या स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. यामध्ये महायुती सरकारच्या विरोधात पत्र लिहिणारे आमदार सतीश चव्हाण हे सध्या नॉट रिचेबल झाले आहेत. सतीश चव्हाण यांनी सरकारविरोधात पत्र लिहिल्यापासून त्यांचा फोन नॉट रिचेबल असल्याचे बोललं जात आहे. यामुळे सतीश चव्हाण हे महायुतीतून बाहेर पडणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
सतीश चव्हाण हे अजित पवार गटातून बाहेर पडल्यानंतर कोणत्या पक्षात जाणार याबद्दल अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही. मात्र सतीश चव्हाण शरद पवार गटात जाणार असल्याचे बोललं जात आहे किंवा ते अपक्ष निवडणुकीसाठी उभे राहू शकतात.
तर दुसरीकडे माढ्याचे आमदार बबनराव शिंदेनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्याऐवजी माझा मुलगा रणजितसिंह निवडणूक लढवेल असे सांगितले आहे. विशेष म्हणजे बबनराव शिंदे यांनी मुलासाठी शरद पवार गटाकडे तिकीटाची मागणी केल्याचेही बोललं जात आहे. त्यामुळे येत्या काळात अजित पवारांना दोन मोठे धक्के बसणार आहेत.















Discussion about this post