मुंबई: बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली असून यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांनी या घटनेवरून सरकारला धारेवर धरले आहे. दरम्यान, या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती सरकारने केली आहे. मात्र उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्षेप घेतला आहे.
प्रकरणात ज्या पक्षाशी संबंधित शिक्षण संस्था आहे, त्याच पक्षाशी संबंधित व्यक्तीची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या व्यक्तीने लोकसभा निवडणूक लढवली आहे. उद्या हे प्रकरण दाबले गेले तर त्याला जबाबदार कोण?, असा सवाल विचारत वडेट्टीवार यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणात उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला आक्षेप घेण्यात आला. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
विजय वडेट्टीवार यांनी बदलापूर प्रकरणावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या या राज्यामध्ये 11 तास त्या मुलींना बसवून ठेवले. त्या मुलीची गर्भवती आई बाकड्यावर झोपली होती. त्यावेळेस तुम्हाला राज्यकर्ते म्हणून लाज वाटत नाही. घटनेचा निषेध करून कारवाई करण्यापेक्षा तुम्ही विरोधकावर याचं खापर फोडत आहात. तुमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये आज 57% गुन्हात वाढ झाली. मागच्या सात महिन्यांमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये 57% वाढ होते, याचे उत्तर द्यायला नको. महिलांवर लाठीचार्ज करताना लाज वाटत नाही. 13 तारखेची घटना होते 16 तारखेला रिपोर्ट होतो. तुम्ही कारवाई करत नाही आणि संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहात, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.















Discussion about this post