जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथून बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आलीय. जम्मू-पुच्छ महामार्गावरील अखनूर येथील तांडा वळणावरील दीडशे फूट खोल दरीत बस कोसळली. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस उत्तर प्रदेशातील हाथरस येथून जम्मूला जात होती. या बसमधून सुमारे ५० ते ६० जण प्रवास करत होते. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी बचाव कार्यसाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेसंदर्भात माहिती दिली.
प्रवाशांनी भरलेली बस उत्तर प्रदेशातील हाथरस येथून जम्मूतील शिव खोडी येथे जात होती. त्यावेळी बस अखनूर येथील तांडा या वळणार आली असताना खोल दरीत कोसळली. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना अखनूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.















Discussion about this post