जळगाव । लोकसभा निवडणुकीसाठी आज सोमवारी चौथ्या टप्पातील मतदान प्रक्रिया पार पडत असून यात जळगाव व रावेरचा समावेश आहे. मात्र मतदानाच्या दिवशी जळगावचे राजकारण तापलं आहे. कारण शिवसेना ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केला आहे. विशेष त्यांनी मंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर निशाणा साधला
“ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महिला बचत गटाला महिलांसाठी काम करायचं सोडून मतांसाठी काम करायला लावलं आहे. बचत गटच्या महिलांना फोन पेवरून पैसे वाटायला लावत आहे. त्यांना दमदाट्या सुरू आहेत. सकाळपासून मला फोन येत आहेत”, असं उन्मेष पाटील म्हणाले.तसेच जळगावात काल चौधरी नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला, असं सांगितले गेलं. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. दबावतंत्र, दादागिरी, दहशतीचे प्रकार सुरू आहेत”, असल्याचंही ते म्हणाले.
“हिंगोली गावातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याला धमकवलं. डुबलीकेट मतदान करू द्या यासाठी त्या अधिकाऱ्याला बुतवर दमदाटी केली. त्यामुळे त्या अधिकाऱ्याला चक्कर येऊन छातीत कळ आली आणि त्याला हार्ट स्पेशलिस्टकडे दाखल केलं आहे.आमदारांच्या गावात प्रचाराला गेल्यावर लाईट बंद केली गेली. ही कुठली संस्कृती आहे?”, असा सवाल उन्मेष पाटील यांनी केला.
“आज देखील आमदाराच्या गावातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला धमकवण्यात आलं. त्या अधिकाऱ्याच्या छातीमध्ये कळ आली. त्याला तज्ज्ञांकडे अॅडमिट केलं आहे. तो अधिकारी आता बोलण्याच्या स्थितीत नाही. काल तो एक जीव गेला. कोणामुळे गेला?”, असाही सवाल उन्मेष पाटील यांनी केला.
लोकांना शांतपणे लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी होऊ दिले पाहिजे. त्यांच्या मनात जे आहे त्यांना ते करू दिले पाहिजे. कलेक्टर, एस. पी. ध्यानावर राजकारण्यांच्या दबावांमध्ये येऊन अशी कृत्य करत असाल तर खपवून घेतले जाणार नाही”, असा इशारा उन्मेष पाटील यांनी दिला.















Discussion about this post