देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून अशातच राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. तामिळनाडूमधील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केपीके जयकुमार यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीमध्ये आढळला आला आहे. मृतदेहाशेजारी पोलिसांना एक चिठ्ठी देखील सापडली असून प्रथमदर्शनी ते त्यांनी लिहिलेले असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी तीन विशेष पथके तयार आहे. केपीके जयकुमार बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या मुलाने पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्षांचा मृत्यूच्या घटनेला राजकीय स्वरूप प्राप्त झालं आहे. एआयएडीएमके प्रमुख इपीएस यांनी, ही घटना म्हणजे ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा कळस असल्याचं म्हटलं आहे. तसंच या प्रकरणता जबाबदार असलेल्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसकडून मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष डीएमकेसोबत युती केली होती. या दोघांनी एकत्र निवडणूक लढवली होती. आता काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या निधनाने या आघाडीवरही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात तामिळनाडूच्या सर्व ३९ जागांवर मतदान झालं.















Discussion about this post