जळगाव । लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर जयश्री महाजन यांनी एक मोठा गौफ्यस्फोट केला आहे. भाजपचे 25 नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा जयश्री महाजन यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
ते म्हणाले की जळगावात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता. लोकसभेचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये अनेक नगरसेवक नाराज आहे. आज जरी तनाने ते आमच्या सोबत नसले तरी मनाने ते आमच्या सोबत आहेत. गुप्त बैठकांमध्ये ते सांगतात की, आम्ही ठाकरेंच्या सेनेंचे काम करणार आहे.
लोकशाही आली पाहिजे आणि भाजपमधील हुकूमशाही सर्व नगरसेवक कंटाळले आहेत. लवकरच भाजपला आमचा धक्का मिळणार असून त्यांचे 25 नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा त्यांनी केला आहे.















Discussion about this post