मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 शीच्या वर गेला. उष्णतेमुळे अंगाची काहिली होतेय. यातच हवामान विभागाने पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातल्या तीन जिल्ह्यात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी आता जास्त काळजी घेण्याची गरज आहे. 27 ते 29 एप्रिल या तीन दिवसात तीन जिल्ह्यांना उष्णतेच्या झळा बसतील. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आव्हान करण्यात आले आहे.
मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये चक्रीय वात विरोधी स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे 27 आणि 28 एप्रिल या दोन दिवसात तापमानात वाढ होऊ शकते, असं हवामान विभागातील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी माहिती दिली आहे. मुंबईसाठी दुसऱ्यांदा हा इशारा देण्यात आला असून याआधी 15 आणि 16 एप्रिल रोजी मुंबईमध्ये अनेक ठिकानी तापमानामध्ये वाढ जाणवली होती. नवी मुंबई सह इतर ठिकाणी तर पारा 41 अंशावर गेला होता. मुंबई, ठाणे, रायगड या तीन जिल्ह्यांना हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा पुन्हा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने काय सल्ला दिलाय?
हवामान विभागाने नागरिकांना दीर्घकाळ उन्हात रहाण टाळा असा सल्ला दिला आहे. पुरसे पाणी प्या, सैल कॉटनचे कपडे वापरण्याचा सल्ला दिला आहे. दुपारच्यावेळी घराबाहेर पडताना चेहरा झाकून घ्या. टोपी घाला, छत्री वापरा असा सल्ला दिला आहे.















Discussion about this post