जळगाव : जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी पुन्हा डोकंवर काढतांना दिसत आहे. याचं दरम्यान, मुक्ताईनगर तालुक्यातील महालखेडा येथील महिलेचा अज्ञान व्यक्तीने दगडाने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हत्या कोणी आणि का? केली यामागील कारण अद्याप कळू शकले नाहीय.
मालताबाई मनोज खाडे ( वय अंदाजे ३७ ) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. त्या आपल्या शेतात काम करण्यासाठी सकाळी गेल्या होत्या. सायंकाळी शेतातील काम आटोपून घरी येताना शिवारातच कुणी तरी अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून त्यांचा खून करून पलायन केले. मालताबाई घरी न आल्यामुळे कुटुंबिय शेताकडे गेले असता सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांनी पथकाला रवाना केले. या पथकाने महिलेचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवत तपासाची चक्रे फिरवली आहेत. या संदर्भात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तर या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Discussion about this post