मुंबई । लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. परंतु ठाकरे गट 22 जागांवर उमेदवार देणार असून पाच जागांवर उमेदवार दिले नाही. त्यामुळे त्या जागांवर सस्पेन्स वाढला आहे. या पाच जागांमध्ये जळगाव लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे.
लोकसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नाहीय. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानं अद्याप आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही. परंतु अशातच आज ठाकरेंनी आपल्या 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर काँग्रेसनं सात जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीनं पाच जागांचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीसाठी दिला होता. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेत, स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी आपले सात उमेदवारही जाहीर केले आहे.
ठाकरे गटाने 16 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर अनिल देसाई यांच देखील नाव संजय राऊत यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे 17 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. परंतु ठाकरे गट 22 जागांवर उमेदवार देणार आहे. आता रहिलेल्या जागांवर सस्पेन्स आहे. त्यात उत्तर मुंबईमधून विनोद घोसाळकर यांच नाव चर्चेत होते. कल्याणमधून उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. जळगावमध्ये ललिता पाटील तर पालघरमध्ये भारती कामडीचे नाव घेतले जात आहे. हातकंणगलेमध्ये राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत यावे, यावर चर्चा सुरु आहे.
यांची नावे जाहीर
बुलढाणा नरेंद्र खेडेकर, यवतमाळ- संजय देशमुख, मावळ – संजोग वाघेरे- पाटील, सांगली -चंद्रहार पाटील, हिंगोली- नागेश अष्टीकर, छत्रपती संभाजीनगर- चंद्रकांत खैरे, धाराशीव- ओमराजे निंबाळकर, शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे, नाशिक- राजाभाऊ वाझे, रायगड – अनंत गिते, रत्नागिरी- सिंधुदुर्ग – विनायक राऊत, ठाणे- राजन विचारे, मुंबई- ईशान्य – संजय दीना पाटील, मुंबई- दक्षिण- अरविंद सावंत, मुंबई- वायव्य अमोल किर्तिकर, मुंबई दक्षिण मध्य- अनिल देसाई, परभणी- संजय जाधव यांचा समावेश आहे.















Discussion about this post