जळगाव | केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभा २०२४ निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. त्यानुसार देशभरात एकूण सात टप्प्यात निवडणूक होती. 19 एप्रिल ते 1 जून या दरम्यान लोकसभा निवडणूका पार पडणार आहेत. निवडणूक आयुक्तांनी आज शनिवारी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली आहे.
यामुळे आता निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. देशातील सात टप्प्यांतील मतदानापैकी महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार असून राज्यात पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे मे या पाच टप्प्यात मतदान होणार असून यातून जळगाव आणि रावेर या जिल्ह्यातील दोन्ही जागांच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान
पहिला टप्पा : मतदान- 19 एप्रिला : रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर (विदर्भातील 5)
दुसरा टप्पा : मतदान- 26 एप्रिल : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण मतदारसंघ – 8)
तिसरा टप्पा : मतदान- 7 मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण मतदारसंघ – 11 )
चौथा टप्पा : 13 मे : नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड (एकूण मतदारसंघ – 11 )
पाचवा टप्पा : 20 मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (एकूण मतदारसंघ – 13 )















Discussion about this post