नवी दिल्ली । देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रातील सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा दिला जात असला तर दुसरीकडे महागाई काही पाठ सोडताना दिसत नाहीय. सर्वसामान्यांना पुन्हा एकदा जबरदस्त झटका बसणार आहे. १ एप्रिलपासून जीवनावश्यक असणाऱ्या औषधांच्या किमती वाढणार आहेत. यात ८०० औषधांचा समावेश आहे.
एप्रिलच्या १ तारखेपासून औषधे-गोळ्यांची किमत वाढेल. सरकराने वार्षिक घाऊक किंमत निर्देशांक मधील बदलानुसार औषध कंपन्यांना त्यांच्या किमती वाढवण्याची परवानगी देण्यास सरकारने मान्यता दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाढत्या महागाई पाहाता औषधांच्या किमती वाढवण्याची मागणी फार्म इंडस्ट्री करत होती.
1. किमती किती वाढणार?
WPI मधील वार्षिक बदलानुसार सरकारने .0055% ची वाढ करण्यास परवानगी दिली आहे. मागच्या वर्षी आणि २०२२ मध्ये नॅशनल लिस्ट ऑफ अत्यावश्यक औषधांच्या (NLEM) अंतर्गत औषधांच्या किंमतीमध्ये १२ टक्के आणि १० टक्के विक्रमी वार्षिक वाढ झाल्यानंतर फार्मा कंपनीसाठी ही मोठ्या प्रमाणात वाढ असेल. यामध्ये ८०० पेक्षा जास्त औषधांचा समावेश असेल. तसेच वर्षातून एकदा औषधांच्या किमती बदलण्याची परवानगी आहे.
कोणती औषधे असतील?
पेनकिलर, अँटीबायोटिक, अँटी- इन्फेक्टीव्हसारख्या ८०० पेक्षा जास्त औषधांचा समावेश असणार आहे. औषधांच्या किमती केंद्र सरकारच्या (Government) नियंत्रणात आहे. कंपनी या औषधांच्या किमती १० टक्क्यांनी वाढवू शकतात. तसेच यामध्ये कर्करोगाच्या औषधांचा समावेश आहे.
या औषधांचे दर वाढतील
अत्यावश्यक औषधांच्या यादीमध्ये पॅरासिटामॉल, अॅझिथ्रोमायसिन सारखी अँटीबायोटिक्स, अॅनिमिया, व्हिटॅमिन्स आणि खनिजे असणाऱ्या औषधांचा समावेश आहे. कोविड-१९ मध्ये वापरल्या गेलेल्या औषधांचा देखील यात समावेश आहे. अशातच औषध कंपनी यामध्ये वाढ करण्याची मागणी करते आहे.
भाव का वाढणार?
उद्योग तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही वर्षांमध्ये औषधांसाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांच्या किमती १५ टक्के ते १३० टक्के च्या दरम्यान वाढल्या आहेत. पॅरासिटामॉलच्या किमतीत १३० टक्क्यांनी एक्सिपिंयट्सच्या किमती १८ ते ६२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. ग्लिसरीन आणि प्रोपीलीन ग्लायकॉलसह सॉल्व्हेंट्स, सिरप ६३ ते ८३ टक्क्यांनी महागले आहे. यामध्ये १००० हून अधिक भारतीय औषधांमध्ये १० टक्क्यांनी वाढ करण्याची परवानगी दिली आहे.















Discussion about this post