जळगाव । आज मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव-धुळे रस्त्यावर असलेला पारोळा तालुक्यातील सब गव्हाण येथील टोलनाका तोडफोड करून पेटून दिल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान,हा टोलनाका आजपासून सुरु होणार होता. मात्र त्यापूर्वीच चार चाकीमधून आलेल्या तरुणांनी संबंधित टोल नाका पेटवून दिल्याने ही सर्व घटना संशयास्पद वाटत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे टोल नाका पेटवून देण्यामागे नेमका काय हेतू होता? याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे.
या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, तोडफोड आणि जाळपोळची संपूर्ण घटना सीसीटीव्हीच्या कॅमेरामध्ये कैद झाली आहे. आजपासून पारोळा तालुक्यातील सब गव्हाण गावातील टोल नाका सुरु केला जाणार होता. अग्रोह इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा हा टोल नाका होता. त्यामुळे आज उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याची सर्व तयारी झाली होती. उद्घाटन झाल्यावर हा टोल नाका वसुलीसाठी सुरु करण्यात येणार होता. मात्र, आदल्या रात्रीच अज्ञात लोकांनी हल्ला करत टोल नाका पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे.
या सर्व घटनेत टोल कंपनीचे अंदाजे दोन कोटींचे नुकसान झाल्याची माहिती मिळत असून टोल नाका पेटवून देण्यामागे नेमका काय हेतू होता? याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे.
Discussion about this post