मुंबई । यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी महाराष्ट्रात एकूण 10 जागांवर निवडणूक लढवली. यापैकी 8 जागांवर शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवारांचा विजय झाला. लोकसभेत घवघवीत यश मिळाल्यानंतर आता शरद पवार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मेगाप्लॅन आखला आहे.
त्यामुळे अजित पवार गटाच्या आमदारांना आणि मंत्र्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
राज्यातील लोकसभा निवडणुकीनंतर पुढच्या चार महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी शरद पवारांनी आतापासूनच तयारी केली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तर आमदारांना पुढचे पाच वर्षे घरी बसावं लागू शकतं. त्यामुळे आमदारांमध्ये चलबिचल सुरु झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटातील किती आमदार आपल्या संपर्कात आहेत, याबाबतचा आकडाच सांगितला आहे. याशिवाय हे आमदार पुढच्या 15 दिवसात अजित पवार गटात सहभागी होतील, असा मोठा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
शरद पवारांचा मेगाप्लॅन काय?
रोहित पवार यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 30 उमेदवारांची नावे निश्चित केल्याची माहिती रोहित पवारांनी दिली आहे. विशेष म्हणजे अजित पवार गटाच्या मंत्र्यांच्या मतदारसंघांमध्ये अजित पवारांनी उमेदवार निश्चित केले आहेत, असं रोहित पवारांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या मंत्र्यांसाठी हा मोठा धक्का असणार आहे. हे मंत्री आगामी काळात शरद पवारांना शरण येतात का? ते आगामी काळात स्पष्ट होईलच. पण रोहित पवार यांनी केलेला दावा मोठा आहे. या दाव्यानुसार घडामोडी घडल्या तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार आहे.















Discussion about this post