पुणे । वारकरी संप्रदायाला हदरवणारी घटना पुण्यातील देवाची आळंदीत घडली आहे. तीन अल्पवयीन मुलांवर नैसर्गिक कृत्य केल्याचा आरोपावरून एका महाराजावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली. दासोपंत उर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर (52 वर्षे) असं या महाराजाचे नाव आहे.
दासोपंत महाराज मृदुंग वारकरी शिक्षण संस्था चालव असून त्याच्याकडे साधारण सत्तर विद्यार्थी दासोपंत महाराजांकडे मृदुंग वाद्याचं धडे घेतात. पण दिवाळीनंतर दासोपंत बिथरले, सुरुवातीला एक व्यसनाधीन विद्यार्थ्याला ब्लॅकमेल केलं आणि त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केलं. मग त्यानंतर दासोपंत महाराजांमधील हैवान जागा झाला. तीन विद्यार्थ्यांवर मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी अनैसर्गिक कृत्य करतच राहिले. कोणाला सांगितल्यास बरं वाईट होईल असं त्यानं धमकावले होते.
मात्र एका विध्यार्थ्याला या वेदना असह्य झाल्यानं, त्याने वडिलांच्या कानावर ही बाब टाकली. मग वडिलांनी थेट आळंदी पोलीस स्टेशन गाठलं. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर दासोपंत महाराजांचं बिंग फुटलं. हे पाहून उर्वरित दोन मुलांनीही त्यांच्या कुटुंबाला याबाबत कळवलं. त्यामुळं आत्तापर्यंत तीन अल्पवयीन मुलांवर नराधम दासोपंत महाराजांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी पॉस्को कलमाखाली आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल करून नराधम महाराजास बेड्या ठोकल्या आहेत. आणखी कुणी पीडित असल्यास त्यांना पुढं येण्याचं आवाहनही पोलिसांनी केलंय. या घटनेमुळं वारकरी संप्रदायात मात्र एकच खळबळ उडालेली आहे.















Discussion about this post