जळगाव ।जळगाव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अनेक नेत्यांनी “ही निवडणूक तुमची आहे आणि तुमच्यासाठी आम्ही मेहनत घेऊ”, अशी ग्वाही दिली होती. मात्र, प्रत्यक्षात नगराध्यक्षांसारख्या महत्त्वाच्या पदांसाठी जिल्ह्यातील काही मंत्री, आमदारांसह नेत्यांनी स्वतःच्या सौभाग्यवतींना किंवा कुटुंबियांना उमेदवारी दिली. यामुळे कार्यकर्त्यांना पुन्हा सतरंज्या उचलण्याची वेळ आली असून भाजपच्या घराणेशाहीवरुन शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी जिल्ह्यातील महायुतीमधील नेत्यांवर सडकून टीका केलीय.
घराणेशाहीला विरोध करणारे भाजपचे जिल्ह्यातील मंत्री आणि आमदार यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपल्या पत्नीला पुढे केल्याने प्रामाणिक कार्यकर्ता भरडला गेला आहे. भाजप ही गांडूळाची ××× झाली आहे, अशी टीका उन्मेश पाटील यांनी येथे केली. मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर त्यांनी थेट निशाणा साधला.
वर्षानुवर्षे पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्या नवीन लोकांना संधी देण्याचे धोरण सध्या भाजपकडून अवलंबण्यात आसे आहे. पूर्वी भाजपमध्ये बदलाची भूमिका होती, आता बदला घेण्याची भूमिका आहे. अर्थात, त्यांनी कितीही दबाव आणला तरी त्यांच्या पुढे आम्ही कोणत्याही परिस्थितीत हार मानणार नाही, असेही माजी खासदार पाटील म्हणाले. दरम्यान, धुळे येथील एका कार्यक्रमासाठी जाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याच्या भेटीसाठी शेताच्या बांधावर जाण्याचे कष्ट घेतले नाही.
आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना त्यांनी भेटीसाठी विमानतळावर बोलवून घेतले होते, याकडेही त्यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले. आज कापूस, केळी आणि सोयाबीनला चांगला भाव नाही. त्या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी कोणत्याही बैठका नाहीत. पैशांच्या जोरावर सत्ता मिळवणे, हेच त्यांचे लक्ष्य असल्याचेही माजी खासदार पाटील म्हटले.















Discussion about this post