मुंबई । ऐन सणासुदीत तूरडाळ महाग झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी 100 रुपयांवर असलेली तूरडाळ आता 160 ते 175 रुपये किलोवर गेली आहे. गेल्या वर्षी झालेली अनियमित पाऊसमान आणि यावर्षी दिलेली पावसाने ओढ याचा थेट परिणाम शेतमालाच्या उत्पादनावर झाल्यामुळे सर्वच खाद्य वस्तूंची भाव वाढताना दिसत आहेत. डाळीने तर रोज दराचा उच्चांक गाठण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
मागील काही दिवसात सातत्याने तुरीचे भाव वाढत आहेत. राज्यातील काही ठिकाणी बारा हजार रुपये क्विंटलने आज तुरीची बाजारात खरेदी झाली आहे. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करुन बाजारात ज्यावेळेस तुरडाळ येते त्यावेळेस त्याचेही भाव वाढताना दिसत आहेत.
आज किरकोळ बाजारात तुरडाळीचा भाव हा 175 रुपये किलो आहे. ऐन सणासुदीत तूरडाळ (Toor Dal) महाग झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी 100 रुपयांवर असलेली तूरडाळ आता 160 ते 175 रुपये किलोवर गेली आहे. हरभरा डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळींच्या दरातही दोन महिन्यांत सरासरी 20 ते 30 रुपयांची वाढ झाली असून, डाळींच्या दरातील तेजी वर्षभर कायम राहण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी झालेले कमी उत्पादन आणि जागतिक बाजारातील कडधान्यांच्या चढ्या दरामुळे देशांतर्गत बाजारात डाळींच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. तूरडाळ दोन महिन्यांत 100 ते 110 रुपयांवरुन 160 ते 170 रुपयांवर गेली आहे. हरभरा डाळ 57 ते 58 रुपयांवरुन 70 रुपये प्रति किलोवर गेली आहे. उडीद डाळ 90 रुपयांवरून 110 रुपये प्रतिकिलो झाली असून, मसूर डाळीतही किलोमागे दहा-बारा रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. मूग डाळ 80 ते 85 रुपयांवरुन 110 रुपयांवर गेली आहे.
Discussion about this post