जळगाव । मागील काही दिवसापासून राज्यभरात परतीच्या पावसाने विश्रांती घेतली आहे. यांनतर तापमानात मोठी वाढ झाली आहे. अनेक जिल्ह्याचा तापमानाचा पारा ३६ अंशाच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. अशातच आज (ता. ५) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर धुळे, जळगाव, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यातील हवामान सातत्याने बदल होत आहेत. सध्या पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका बसत आहे. त्यामुळे तापमानात मोठी वाढ झाली असून नागरिकांना उकाडा जाणवू लागला आहे. पहाटेच्या वेळी धुके आणि दव त्यानंतर दुपारी कडाक्याचं ऊन असं चित्र आहे.















Discussion about this post