भुसावळ । आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून एकूण 40 विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यापैकी तीन गाड्या कोल्हापुरातून धावणार आहेत. या तीन गाड्यांच्या मिळून एकूण 160 फेऱ्या कोल्हापूरहून होणार आहेत. यामधील एक ट्रेन ही भुसावळ मार्गे धावणार आहे.
कोल्हापूर-कटिहार दरम्यान 01405/01406 क्रमांकाची साप्ताहिक विशेष गाडी धावणार आहे. ही सेवा 14 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. कोल्हापुरातून दर रविवारी सकाळी 9.36 वाजता सुटणारी ही गाडी मंगळवारी सकाळी 6.10 वाजता कटिहार (बिहार) येथे पोहोचेल. तर कटिहारहून ही गाडी दर मंगळवारी संध्याकाळी 6.10 वाजता सुटून गुरुवारी दुपारी 3.35 वाजता कोल्हापुरात दाखल होईल. ही गाडीला भुसावळला थांबा असणार असल्यामुळे भुसावककर प्रवाशांना दिलासा मिळाला.
कोल्हापूर-मुंबई दरम्यान 01417/01418 क्रमांकाची साप्ताहिक विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. ही सेवा 24 सप्टेंबरपासून 27 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. कोल्हापुरातून दर बुधवारी रात्री 10 वाजता सुटणारी ही रेल्वे, दुसऱ्या दिवशी दुपारी 1.30 वाजता मुंबईत पोहोचेल. तसेच, दर गुरुवारी दुपारी 2.30 वाजता मुंबईतून सुटणारी ही गाडी, शुक्रवारी पहाटे 4.20 वाजता कोल्हापुरात दाखल होईल.
दरम्यान, कोल्हापूर-कलबुर्गी मार्गावर 01209/01210 क्रमांकाची विशेष गाडी 29 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबरदरम्यान धावणार आहे. ही गाडी शुक्रवारी वगळता आठवड्यातील इतर सर्व दिवशी धावेल. कोल्हापुरातून सकाळी 6.10 वाजता सुटणारी गाडी दुपारी 4.10 वाजता कलबुर्गी येथे पोहोचेल. तर, दररोज संध्याकाळी 6.10 वाजता कलबुर्गीतून सुटून ही रेल्वे दुसऱ्या दिवशी पहाटे 5.40 वाजता कोल्हापुरात येणार आहे.
भारतात दररोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेचा वापर करून प्रवास करतात. रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या वंदे भारत गाड्यांनाही प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून त्यामध्ये प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या गर्दीचा आणि प्रवाशांच्या मागणीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने सात महत्त्वाच्या मार्गांवरील वंदे भारत गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रवाशांना जास्त आसने उपलब्ध होतील आणि रेल्वेचे उत्पन्नही वाढण्यास हातभार लागणार आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.















Discussion about this post