नवी दिल्ली । यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून एनडीएमधील सर्व घटक पक्षांनी नरेंद्र मोदींना आपला नेता म्हणून निवडलं आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. मात्र शपथविधीची तारीख अद्याप जाहीर झालेली असून अशा स्थितीत आता सरकारची मोठी मंत्रिपदे कोणाला मिळतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.
परंपरेप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी नव्या सरकारच्या शपथविधीपूर्वी पंतप्रधानपदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नव्या सरकारच्या स्थापनेपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी मोदींकडे सोपवली आहे. नवीन सरकार भाजपाप्रणीत एनडीएचच येणार आहे.
आता नव्या सरकारमध्ये भाजपाला पूर्वीसारखी एकाधिकारशाही चालवता येणार नाही. कारण त्यांच्याकडे स्वबळावर पूर्ण बहुमत नाहीय. त्यांचं सरकार इतर पक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. त्यामुळे भाजपाला यावेळी महत्त्वाची खाती सोडावी लागू शकतात. याआधी मित्रपक्षांची भाजपाने एक ते दोन मंत्रिपदांवर बोळवण केली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. नव्या सरकारमध्ये भाजपला पाच मंत्रिपद गमवावी लागणार अशी माहिती आहे
एनडीएमध्ये बिहारमधून येणाऱ्या नितीश कुमार यांच्या जेडीयूकडे 12 तर टीडीपीच्या चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाकडे 16 खासदार आहेत. फॉर्म्युलानुसार नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना तब्बल पाच मंत्री पद दिली जाणार आहेत. पाच खासदारांमागे एक कॅबिनेट मंत्रीपद असा भाजपाचा फॉर्म्युला असल्याची सूत्रांची माहिती आहे. नितीश कुमार यांच्या 12 जागांसाठी 2 कॅबिनेट मंत्रीपद तर चंद्राबाबू नायडू यांच्या 16 जागांसाठी 3 कॅबिनेट मंत्री पद दिली जाणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7 खासदार आहेत. त्यामुळे त्यांना सुद्धा एक कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे.















Discussion about this post