कोल्हापूर जिल्ह्यातील शिंगणापूर ग्रामसभेत एक विचित्र ठराव केला असून या ठरावाची कॉपी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. तो म्हणजे गावात मुस्लिम मतदारांची नवीन नावे मतदार यादीत समाविष्ट न करण्याचा विचित्र ठराव ग्रामसभेत केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान प्रकरणाचे गांभीर्य पाहता आता गावच्या सरपंचांनी या प्रकरण सारवासारव करत हे पत्र दिशाभूल करणारे असून, बांगलादेशी अल्पसंख्याकांबाबतचा तो ठराव असल्याचं सांगितलं आहे.तर तो वादग्रस्त ठराव अधिकृत नसल्याचं ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सांगितलें आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषद स्तरावर गटविकास अधिकारी आणि करवीर तहसीलदारांना देण्यात आले आहेत. या प्रकरणातील दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं जिल्हाधिकाऱ्यांनीसांगितलं आहे.
विषय क्र 2 अल्पसंख्याक (मुस्लीम ) मतदान नोंदणी बाबत.
‘मौजे शिंगणापूर गावच्या गावसभेत वरील विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली व शिंगणापूर गावच्या हद्दीतील नवीन मतदार नोंदणी करतेवेळी नवीन येणाऱ्या अल्पसंख्याक (मुस्लीम) यांची नवीन मतदान नोंदणीत नावे समाविष्ट करणेत येवू नयेत असे सर्वानुमते ठरले.
तसेच ज्या ज्या वेळी नवीन मतदार यादी प्रसिद्ध होईल तेव्हा नवीन अल्पसंख्याक (Muslim) यांची नावे नोंद झालेचे निदर्शनास आल्यास त्यावर ग्रामपंचायत मार्फत हरकती घेवून सदरची नावे कमी करणेत यावीत असे हि सर्वानुमते ठरले त्यास आजची गावसभा सर्वानुमते मंजुरी देत आहे.’
Discussion about this post