मुंबई । राज्यात पार पडलेल्या महापालिकांच्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून अनेक ठिकाणी भाजपनंतर शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे महापौर आणि सत्तेत कोण बसणार याचा पेच वाढला आहे. त्यात राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याचे संकेत मिळाले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हा बॉम्ब फोडला आहे.
एकवेळ भाजपसोबत जाण्याचा विचार होऊ शकतो, पण शिंदेसेनेसोबत युती मान्य नाही, असे संजय राऊत म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुंबईत काहीही घडू शकतं, असं सूचक विधान मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. त्यामुळं आगामी दिवसांत नवी राजकीय समीकरणं तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आमच्यातून अद्याप काही निर्णय झाला नाही. आम्ही अशा प्रस्तावांना अनेकदा केराची टोपली दाखवतो. भाजपसोबत काही ठिकाणी म्हणजे अत्यंत अस्थिरता आहे, तिथे आम्ही शिंदेंसोबत कदापि जाणार नाही. जिथं काही पर्याय उपलब्ध असतील त्यासंदर्भात पक्षप्रमुख निर्णय घेतील. परस्पर कुणीही काही निर्णय घेणार नाही, असे राऊत म्हणाले.















Discussion about this post