मुंबई । भाजपाचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. येत्या ८ दिवसात मोठा राजकीय भूकंप होणार आहे, या भूकंपाच्या धक्क्यात ठाकरे गट जमीनदोस्त होणार असल्याचं भाकित गिरीश महाजन यांनी केलंय. तर राऊतांच्या बडबडीमुळे स्वतः उद्धव ठाकरे देखील अस्वस्थ झाले असतील, असेही महाजनांनी नाशिक येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटले होते.
ज्यानंतर ठाकरे गट आणि मंत्री गिरीश महाजन अशा नव्या वादाला सुरुवात झाली आहे. पण आता महाजनांच्या या टीकेला खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाजनांच्या 10 पिढ्या आल्या तरी आमचा पक्ष संपवू शकणार नाही, असा पलटवार राऊतांनी केला आहे.
Discussion about this post