मुंबई । मराठा आरक्षणाचे विधेयक अधिवेशनात मंजूर झाल्यानंतरही मनोज जरांगे पाटील हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत. सगेसोयऱ्याबाबतचा अध्यादेश निघेपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलन तीव्र करण्याची घोषणा करत असताना त्यांना आरोपांना समोरे जावे लागत आहे. बुधवारी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपानंतर आता जरांगे पाटील यांच्या सहकारी राहिलेल्या संगीता वानखेडे यांनी धक्कादायक आरोप केले आहेत.
संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवली. त्या म्हणाले,” मनोज जरांगे भोळा भाबडा माणूस, मूळ भाषा शैलीत बोलणारा माणूस म्हणून मी आधी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मनोज जरांगे यांची बाजू घेऊन मी छगन भुजबळ यांना ट्रोल केले. परंतु मला खरे समजल्यावर गेल्या १ ते १.५ महिन्यांपासून मी विरोध करत आहेत. मनोज जरांगे कोणाला विश्वासात घेत नव्हते. त्यांना शरद पवार यांचाही फोन येत होता. शरद पवार जसे सांगतात तसेच मनोज जरांगे करतात. पुणे शहरात मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले ते राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी यांनी लावले होते. महाराष्ट्राला त्यांनी वेड बनवले आहे. ”
याआधी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन अजय महाराज बरासकर यांनी मनोज जरांगे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. ते म्हणाले होती की, मनोज जरांगे यांना अध्यादेश, अधिनियम यामधील फरक माहीत नाही. अधिकाऱ्यांशी ते खालच्या भाषेत बोलतात. त्यांना अक्कल नाही. लोकांची ते फसवणूक करतात. अनेक कुटुंबाना त्यांनी उद्धवस्थ केले आहे. ते हेकेखोर आहेत. यामुळे मराठा समाजाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. १० फेब्रुवारी रोजी उपोषण करण्यासाठी त्यांनी समाजाची मंजुरी घेतली नाही. आधी ठरते वेगळे आणि माध्यमांशी बोलताना ते वेगळी भूमिका घेतात, असा आरोप अजय महाराज यांनी केला.
Discussion about this post