लातूर । राज्यातील महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूर येथे उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला हजेरी लावली होती. या सभेतून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविषयी एक विधान केले आहे. ज्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. या विधानानंतर विलासराव देशमुख यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुख याने फेसबुकवरून व्हिडीओ शेअर करत संयमीपणाने प्रत्युत्तर दिले आहे.
नेमकं काय म्हणाले रवींद्र चव्हाण?
लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण शहरात आले होते. यावेळी त्यांनी सभा घेत भाषण केले. या भाषणातून रवींद्र चव्हाण यांनी उपस्थितांना संबोधित करताना दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल विधान केले. ते म्हणाले, “लातूरमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतोय. हा उत्साह पाहून लक्षात येते की, लातूर शहरातून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील, यात कोणतीही शंका नाही”.
रितेश देशमुखचे प्रत्युत्तर
त्यांनी केलेल्या या विधानंतर रितेश देशमुख याने फेसबुकवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत, “दोन्ही हात वर करून सांगतो. लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेल्या असतात. लिहिलेलं पुसता येतं. कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र.” अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.















Discussion about this post